Posts

नावात काय आहे ? विवाहानंतर महिलांना नाव बदलणे कायद्याने अनिवार्य असते का ? - ॲड. रोहित एरंडे ©

नावात काय आहे ? विवाहानंतर महिलांना नाव बदलणे कायद्याने अनिवार्य असते का ? डिव्होर्सनंतर नाव बदलता येते का ? ॲड. रोहित एरंडे © विख्यात इंग्रजी  लेखक, नाटककार  विल्यम शेक्सपियर यांच्या 'रोमियो आणि ज्युलियेट' (Romeo and Juliet) या अजरामर शोकांतिकेमधील "नावात काय आहे?, गुलाबाला आपण दुसऱ्या कोणत्याही नावाने बोलावले तरी त्याचा सुगंध असाच गोड राहील" हे वाक्य सर्वांना माहिती असेलच.   तर काही दिवसांपूर्वी , लग्नानंतर महिलांनी माहेरचेच संपूर्ण  नाव    ठेवण्याची  वाढती प्रवृत्ती आणि भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या कायदेशीर अडचणी  या बाबत एक लेख वाचण्यात आला आणि हा मेसेज व्हॅट्सऍपवर खूप व्हायरल झाला आणि त्यावरील  चर्चेत लोकांचा बराच डेटा खर्ची पडला. यामध्ये मैल विरुद्ध पुरुषी संस्कृती असेही स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले आणि एकंदरीतच बऱ्याच ठिकाणी या विषयावर तिखट चर्चा झाल्याचे दिसून आले. या विषयावर कायदेशीर दृष्टीने लेख लिहिण्याची आमचे ग्रुप कॅप्टन मुकुंदराव लेले यांचेकडून विचारणा झाली आणि म्हणून  हा लेखन प्रपंच.    हा विषय महत्त्व...

विधवा सुनेचे सासरकडील मिळकतीमधील हक्क : ॲड. रोहित एरंडे ©

 विधवा सुनेचे सासरकडील मिळकतीमधील  हक्क  ॲड. रोहित एरंडे © आमच्या मुलाचे मागील वर्षी अकस्मात निधन झाले. या धक्क्यातून अजूनही आम्ही सावरलेलो नाही  तोच आमची सून आता सतत काहीतरी भांडणे काढून माझ्या   संपत्तीमधला हिस्सा मागत आहे, नाहीतर कोर्टात जैन अशी धमकी देत आहे. जी काही संपत्ती आहे ती मी  स्वतः कमावलेली आहे. आम्हाला    अजून   १ मुलगी  देखील आहे. सुनेला दुसरे लग्न देखील करायचे आहे. तर सुनेला आमच्या मिळकतीमधील हिस्सा द्यायला लागतो  का ?    काही लोकं आम्हालाच  सुनेविरुद्ध कोर्टात जाण्यास सांगत आहेत ? काय करावे  सुचत नाही..  एक त्रस्त  वडील आणि सासरे , पुणे.  सर्व प्रथम तुम्हाला या दुःखद प्रसंगामधून तुम्हा उभयतांना  लवकर सावरण्याची ताकद परमेश्वर देवो.  मात्र जेव्हा कायद्याचा प्रश्न  येतो तेव्हा सजग असणे गरजेचे असते आणि कायद्यामध्ये भावनांना थारा  नाही हे  लक्षात घेऊन लवकर पुढची पाऊले उचला.   आता तुमच्या प्रश्नाकडे वळू या. सर्वप्रथम ही  सर्व मिळकत तुम्ही...

गटारी अमावस्या नव्हे तर दिव्याची अवस : ॲड. रोहित एरंडे ©

 गटारी अमावस्या नव्हे तर दिव्याची अवस :  ॲड. रोहित एरंडे © महाराष्ट्राच्या लोकजीवनात अनेक सण, व्रतवैकल्ये आणि परंपरा अशा आहेत की त्यांचा अर्थ केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित राहत नाही. त्यामागे सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक अशी अनेक पदरे दडलेली असतात. ‘दिव्याची अवस’ ही अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. नावाप्रमाणेच या परंपरेच्या केंद्रस्थानी आहे—दिवा -दीप .   महाराष्ट्रात ‘अवस’ हा शब्द सामान्यतः अमावास्येसाठी वापरला जातो.  ‘दिव्याची अवस’ म्हणजे अमावस्येच्या दिवशी दिव्याची पूजा करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा. काही ठिकाणी तिला ‘दिव्यांची अमावस्या’ असेही म्हटले जाते. या दिवशी घरातील दिवे, समई, पणत्या किंवा प्रकाश देणाऱ्या वस्तू स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते.  मात्र गेले काही वर्षांत या अमावास्येला "गटारी अमावस्या" असे म्हणणे प्रचलित झाले आहे आणि कारण काय तर दुसऱ्यादिवशी पासून श्रावण सुरु होणार आणि मग नवरात्र होई पर्यंत सणांची -धार्मिक कार्यक्रमांची  रेलचेल  असल्यामुळे  आजचा  दिवस जणू   सामिष आहार आण...

फांदी वाहनावर पडणे हा 'मोटार वाहन अपघात' नाही - सर्वोच्च न्यायालाय - ॲड. रोहित एरंडे ©

 फांदी वाहनावर पडणे हा 'मोटार वाहन अपघात' नाही  - सर्वोच्च न्यायालाय ॲड. रोहित एरंडे © सध्या  पाऊसामुळे झाडे किंवा फांद्या पडण्याच्या बऱ्याच घटना आपण बघितल्या असतील, ज्यामध्ये काहीवेळा जीवित अथवा वित्त हानी सुध्दा होते., मात्र सार्वजनीक ठिकाणी अशी घटना झाल्यास अश्या हानीला कोण जबाबदार ? असा प्रश्न सर्वोच्च   न्यायालयापुढे नुकताच उपस्थित झाला.    मुसळधार पाऊस आल्यामुळे रस्त्याच्या कडेला झाडाखाली थांबलेल्या वाहनावर जर झाडाची फांदी पडून इजा अथवा हानी झाल्यास    त्याला मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicles Act) अपघात मानले जाऊ शकत नाही आणि अशा प्रकरणांमध्ये संबंधित महानगरपालिकेला मोटार वाहन कायद्यानुसार 'थेट' जबाबदार धरता येणार नाही,  असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या केसमधील  निरीक्षणे खूप महत्वाची आहेत, त्याआधी केसची थोडक्यात पार्श्वभूमी बघू यात.   घटना आहे  २३ जून २००७ रोजीची. बेंगलुरू येथील श्री. के.के. उमेश कुमार (तक्रारदार)  हे रिक्षाने प्रवास करत असताना अचानक खूप मुसळधार पाऊस सुरु झा...

जागा नावावर करायचीय म्हणजे काय ? ऍड. रोहित एरंडे ©

जागा नावावर करायचीय म्हणजे काय  ? "संध्या छाया भिववती हृदया " आयुष्याच्या या टप्प्यावर असलेली अनेक जोडपी आमच्याकडे येतात आणि बहुतांशी लोकांचा एकच प्रश्न असतो की "माझी/आमची जागा जोडीदाराच्या /मुलं-मुलीच्या नावावर करायची आहे" किंवा "जरा आमचा इंडेक्स-२ बदलून घ्यायचा आहे" . सध्या  रिडेव्हल्पमेंटचे वारे जोर वाहत आहे त्यामुळे "नवीन फ्लॅटवर मुला -मुलींचे नाव कसे लावता येईल" असेही प्रश्न विचारले जातात.      बहुसंख्य लोकांना असे वाटत असते की, तहसीलदार ऑफिस मध्ये  ७/१२ च्या उताऱ्याला किंवा   प्रॉपर्टी कार्डला नाव लावायचा अर्ज दिला किंवा लाईट बिल, प्रॉरती टॅक्स बिलावर नाव लावले की झाले.  कायदा मात्र वेगळा आहे आणि याची थोडक्यात माहिती घेऊ.     मिळकतीमधील मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक  व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो.  इंडेक्स-२ म्हणजे काय ?  रजिस्ट्रेशन कायदा १९०८ च्या कलम ५५ अन्वये विविध प्रकारचे इंडेक्स (सूची) तयार केले जातात....

#आखाड #आषाढ - 'आषाढस्य प्रथम दिवसे' ते "आषाढ सासरा" -

 #आखाड #आषाढ - 'आषाढस्य प्रथम दिवसे' ते "आषाढ सासरा"  आज पासून आषाढ  महिना सुरू झाला आहे. मांसाहारी लोकांसाठी हक्काचा असलेला 'आखाड'  हा त्याचा प्रचलित अपभ्रंश आहे.   'आषाढस्य प्रथम दिवसे' ही महाकवी कालिदासाच्या 'मेघदूत' या प्रसिद्ध काव्यातील सुप्रसिद्ध ओळ सर्वांना सुपरिचित आहे. या काव्याच्या दुसऱ्या श्लोकाची सुरुवात 'आषाढस्य प्रथम दिवसे...' अशी होते.  आषाढाच्या पहिल्या दिवशी एका शापीत यक्षाने पर्वताच्या शिखरावर आलिंगन देऊन बसलेल्या   एका मेघाला बघितल्यावर तो मेघ   स्वतःच्या सुळ्यांनी   धडक मारणाऱ्या हत्तीसारखा सुंदर दिसत होता आणि   त्या मेघालाच आपली पत्नीकडे (अलकानगरीत) निरोप पाठवण्यासाठी तो यक्ष दूत बनवतो. या पहिल्या दिवसाच्या वर्णनावरूनच आषाढाच्या पहिल्या दिवशी 'महाकवी कालिदास दिन' आणि 'संस्कृत दिन' साजरा केला जातो.  यक्ष (ज्याला कुबेराने शिक्षा केली आहे).  आपल्या मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रसंगावरून, सणांवरून विविध म्हणी आहेत. त्यातलीच एक म्हणजे  आषाढ सासरा. "आषाढ सासरा : लग्न झाल्यानंतर नव्या...

गृहिणीच्या कामाचे केलेले "सर्वोच्च" मोल ...ॲड. रोहित एरंडे.

 गृहिणीच्या कामाचे केलेले "सर्वोच्च" मोल ... ॲड. रोहित एरंडे. © काही  दिवसांपूर्वी कॉमर्स कॉलेजमधील मित्रमंडळी बऱ्याच दिवसांनी एकत्र जमलो होतो. हास्य विनोद चालू होते.  . घरातली कामे  कोण कोण   करतात ?  असा विषय चालू असताना एक मुलगा म्हणाला, घरकाम हे काही आमचे काम नाही, ते आईचे आहे , मी बाबासारखा मोठा बिझनेसमन होणार, तो खूप काम करतो आणि पैसे कमावतो"... हे वाक्य  ज्यांना सध्या "चुणचुणीत" म्हणतात अश्या मुलाने उच्चारल्यावर  क्षणभर एकदम शांतता पसरली आणि कॉलेज दिवसात टॉपर असणाऱ्या , स्वतःचा   पार्लर सुरु करणार असे नेहमी सांगणाऱ्या त्या  मैत्रिणीच्या डोळ्यात मात्र टचकन पाणी आले.    हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे   सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक निकाल सध्या खूपच व्हायरल झाल्याचे दिसून आले आणि या निकालाचा अभ्यास करता त्यातील सर्वोच्च न्यायालायने नमूद केलेली निरीक्षणे खूपच महत्वाची आहेत हे  दिसून आले.  एका निकालाच्या निमित्ताने  "गृहिणी या राष्ट्रनिर्मात्या आहेत एवढे त्यांच्या कामाचे महत्त्व आहे. एखाद्या...

डॉक्टरांवरील हल्ल्याचा गंभीर आजार - ॲड. रोहित एरंडे ©

  हल्ले डॉक्टरांवर, परिणाम समाजावर.... ऍड रोहित एरंडे. ©  डोंबिवली येथे शिवसेनेच्या नगरसेवकाने आणि रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि नर्स यांच्यावर हल्ला केल्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे.  अश्या घटना भारतभर घडत आहेत आणि एका अभ्यासानुसार सुमारे ७०% डॉक्टरांवर कधी ना कधी अशा प्रसंगांना सामोरे जायची वेळ आली आहे, असे क्वचितच कुठल्या इतर देशांत घडत असेल.  डॉक्टर-पेशंट हे नाते दिवसेंदिवस दुष्टचक्रात गुरफटत चालले आहे.  भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी देखील काही वर्षांपूर्वी एका समारंभात ह्याबद्दल चिंता व्यक्त करता नमूद केले होते की असेच जर प्रकार चालू राहिले तर  डॉक्टर औषधाला देखील मिळणार नाहीत.   इतर कुठल्याही प्रोफेशन पेक्षा डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हणून ओळखले जाते. डॉक्टर जर का देव असेल, तर त्याची विटंबना (हल्ला )करू नका....आणि...डॉक्टर जर का देव नसेल तर, त्याच्या मर्यादा ओळखा. परिस्थती खरंच गंभीर झाली आहे की  "सेव्ह द सेव्हिअर" असे म्हणायची वेळ आली आहे.  जर आता हल्ल्यांचे गैर प्रकार वेळीच रोखले नाहीत , तर त्याचे गंभीर परिणाम...

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्त : #लोकमत ॲड. रोहित एरंडे. ©

 हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्त : ॲड. रोहित एरंडे. © या लेखाद्वारे आपण  "हक्कसोड पत्र" किंवा ज्याला इंग्रजीमध्ये "रिलीज डीड" म्हणतात या एका महत्वपूर्ण दस्ताची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू.   दस्ताच्या नावावरूनच आपल्या लक्षात आले असेल की हक्क सोडण्यासाठी मिळकतीमध्ये हक्क असणे अभिप्रेत आहे. जेव्हा २ किंवा अधिक व्यक्तींना एकाच मिळकतीमध्ये हक्क असतो आणि त्यामधील कुठल्याही एका सहमालकाला त्याचा/तिचा हिस्सा हा अन्य सहमालकाच्या लाभामध्ये सोडून द्यायचा असेल, तेव्हा हक्क सोड पत्र दस्त बऱ्याच वेळा केला जातो. मात्र हा  हक्क इनहेरिटेड /वारशाने आला  असेल तरच हक्कसोड पात्र होऊ शकते. उदा. वडील मृत्युपत्र न करता मयत झाल्यावर त्यांचे वारस एकमेकांमध्ये हक्क सोडून देऊ शकतात, पण समजा नवरा-बायकोने एकत्रीतरित्या प्रॉपर्टी घेतली असेल आणि त्यांच्यापैकी एकाला दुसऱ्याच्या लाभात हयातीमध्ये हक्क सोडून द्यायचा असेल तर एकतर खरेदीखत होऊ शकते किंवा बक्षीसपत्र  होऊ शकते, पण हक्कसोडपत्र होणार नाही,  महत्त्वाचा फरक लक्षात घ्यावा.    हक्कसोड पत्र आणि स...

बिल्डरच्या दृष्टीकोनातून : अपार्टमेंट करावी का सोसायटी ? ॲड. रोहित एरंडे ©

 बिल्डरच्या  दृष्टीकोनातून :  अपार्टमेंट करावी का सोसायटी ? अपार्टमेंट आणि सोसायटी - यांच्यामधील महत्वाचे फरक काय ? ॲड. रोहित एरंडे © क्रेडाई पंढरपूर  यांनी मला महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. सोसायटी चांगली का अपार्टमेंट असे प्रश्न बरेचदा विचारले जातात आणि ह्याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज दिसून येतात. काही ठिकाणी तर अपार्टमेंट असेल तर बिल्डरच मालक होणार आणि जागा हडपणार असे मेसेजेस व्हायरल होत आहेत.  प्रत्येकाचे फायदे तोटे वेगळे. ह्या लेखाच्या अनुषंगाने सोसायटी आणि अपार्टमेंट मधील ठळक फरक थोडक्यात बघू यात.  सर्वात आधी कन्व्हेयन्स या विषयाने सुरुवात करू..  कन्व्हेयन्स म्हणजे ? आजही अनेक ठिकाणी बहुतांश सोसायट्यांचा कन्व्हेयन्स झालेला दिसून येत नाही. कन्व्हेयन्सचा अर्थ एखाद्या जागेमधील मालकी हक्क दुसऱ्याच्या नावे तबदील करणे, थोडक्यात खरेदी खत असे म्हणता येईल. भारतामध्ये 'ड्युअल ओनरशिप' हि पद्धत आहे, म्हणजेच  जमिनी ची मालकी एका कडे व त्यावरील इमारतीची मालकी दुसऱ्याकडे असू असते, तर बहुतांश पाश्चात्य देशांमध्ये ज्याच...

चुकीच्या केशकर्तनासाठी लाखोंची नुकसानभरपाई !! ॲड. रोहित एरंडे ©

 चुकीच्या केशकर्तनासाठी लाखोंची नुकसानभरपाई !! ॲड. रोहित एरंडे ©  भारताच्या  सर्वोच्च न्यायालयात कोण-कोणते विषय जाऊ शकतात याची जंत्री काढणे हाच एक संशोधनाचा विषय होईल. कोणाचे काय तर कोणाचे काय असे म्हणतात. असाच एक मजेशीर खटल्यावर   सर्वोच्च न्यायालयाने  नुकताच एक निकाल दिला. ही केस सुरु होते  २०१८ मध्ये.  आय आय एम कलकत्ता येथील पदवीधर असलेल्या आणि नंतर मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये गेलेल्या आशना रॉय नावाच्या मॉडेल   नवी दिल्लीमधील आयटीसी मौर्य या पंचतारांकित हॉटेल मधील ब्युटी पार्लर मध्ये केस कापण्यास आली होती. मात्र तिला पाहिजे तसे केस कापले नाहीत, हेअर स्टायलिस्टने तिच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, केस पाहिजे तेवढे छोटे कापले नाहीत आणि नंतर जी हेअर-ट्रीटमेंट घेतली त्यामुळे तिच्या  टाळूला दुखापत झाली आणि या सर्व   सेवेतील त्रुटींसाठी     आणि वैद्यकीय निष्काळजीपणासाठी    आशना ताईंनी थेट राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे  तब्ब्ल २ कोटींच्या नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला आणि तो २०२१ मध्ये मान्य झाला आणि हा ...

विमा रक्कम अपघात भरपाईमधून वजा करता येणार नाही : ॲड. रोहित एरंडे. ©

विमा रक्कम अपघात भरपाईमधून वजा करता  येणार नाही  ॲड. रोहित एरंडे. © एखाद्या व्यक्तीला अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार, उपचारासाठी झालेला खर्च  विमा पॉलिसीतून  मिळविण्यासाठी  करणारी धडपड आणि कधी कधी   अपघात भरपाई मिळण्यासाठी कोर्टात माराव्या लागणाऱ्या चकरा अश्या दिव्यातून जावे लागते आणि ज्यांच्यावर दुर्दैवाने अशी वेळ असेल अशांनाच यातील वेदना समजतील.. तर मोटार अपघात भरपाई न्यायाधिकरण (MACT) कडून मिळणाऱ्या भरपाईतून आरोग्यविमा (Mediclaim )पॉलिसीमधून मिळालेली रक्कम वजा करता येईल का? असा महत्त्वपूर्ण प्रश्न नुकताच मा. सर्वोच्च न्यायालायने निकालात काढला.  या केसची थोडक्यात पार्श्वभूमी बघू यात. अपघात झाल्यानंतर "अ " व्यक्तीने   MACT समोर नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला. त्या दाव्यात उत्पन्नात झालेले  नुकसान, भविष्यातील उत्पन्नाच्या संधींचे नुकसान, विशेष आहार, प्रवास खर्च तसेच वैद्यकीय खर्च यांसारख्या बाबींचा समावेश करण्यात आला होता. मात्र त्याच वेळी, याच वैद्यकीय खर्चांसाठी वैद्यकीय विमा (Mediclaim Insurance) अंतर्गत विमा कंपन...

इच्छापत्र स्वतःच्याच इच्छेप्रमाणे करणे अपेक्षित, मुलांच्या नाही ! #लोकमत : ॲड. रोहित एरंडे ©

  इच्छापत्र स्वतःच्याच  इच्छेप्रमाणे  करणे अपेक्षित, मुलांच्या नाही  ! #लोकमत   नुकतेच बँकेतून निवृत्त झालेले नवरा बायको ऑफिस मध्ये  इच्छापत्र (विल /मृत्युपत्र ) करण्याबात माहिती घेणयासाठी आले होते.   काका म्हणाले, " आमची सर्व स्थावर जंगम मिळकत ही मी आणि माझ्या पत्नीने बँकेत नोकरी करून कष्टातून कमावली  आहे. आम्हाला एक मुलगा एक मुलगी असून दोघांचीही लग्ने  झाली आहेत". काकू म्हणाल्या, "काही दिवसांपूर्वी आम्ही घरात चर्चा करत होतो की सध्याच्या धकाधकीच्या  काळात  'विल' लवकरात लवकर करावे, आपल्या काही मित्र मंडळीनीं केले आहे", "मात्र    याची कुणकुण लागल्यावर  अचानक मुलगा आणि सून आणि मुलगी आणि जावई स्वत्रंतपणे आमहाला भेटले आणि  त्यांच्या इच्छा काय काय आहेत  हे सांगायला लागले" त्यांचे म्हणणे होते की आमचे जे काही आहे ते त्यांनाच मिळणार त्यामुळे विल कसे करावे, आमच्याच वकीलांकडून करून घेऊ असे बोलायला लागल्यावर आम्हाला जरा वावगे वाटले.. ते काका म्हणाले "आमची टाप नव्हती बुवा आमच्या आई वडिलांशी अश्या बाबत बोलण्या...

नवीन कामगार कायदे : शाप की वरदान ? : ॲड. रोहित एरंडे ©

नवीन कामगार कायदे : शाप की वरदान ? ब्रिटिश कालीन कायदे बदलण्यासाठी या सरकारने विविध कायदे बदलण्याची मोहीम सुरु केली. त्या अंतर्गत इंडियन पिनल कोड, १८६०, पुरावा कायदा १८७२ आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यांचे कालसुसंगत एकत्रीकरण करून भारतीय न्याय संहिता २०२३ हा नवीन कायदा पारित झाला. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सदनांत   ब्रिटिशकालीन सुमारे ७१ कायदे बदलण्यासाठी एक बिल मान्य  केले ज्यामध्ये ही प्रोबेट सक्तीची १०० वर्षांपूर्वीची, विशिष्ट धर्मियांनाच लागू असणारी, तरतूद काढून टाकली आहे. याच धर्तीवर काळाच्या ओघात बदलत्या कामाच्या पद्धती आणि रोजगाराच्या नवीन स्वरूपांमुळे अधिक सोप्या आणि सुसंगत प्रणालीची गरज अधोरेखित झाली, ज्यामुळे भारत सरकारने २९ केंद्रीय कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार कामगार संहितांमध्ये सुसूत्रीकरण केले, त्याची थोडक्यात माहिती करून घेऊ.  त्यापूर्वी भारतीय कामगार कायद्यांचा थोडक्यात इतिहास बघणे गरजेचे आहे.  इतर अनेक कायद्यांप्रमाणे कामगार कायदे म्हणजेच labor laws हे देखील ब्रिटिशांची देन आहे. नंतर  वेळोवेळी विविध कायदे ...

पुनर्विवाह आणि सावत्र मुलांचे हक्क. : #लोकमत - ॲड. रोहित एरंडे ©

 साधारण पन्नाशीच्या आसपास वाटावेत  असे एक जोडपे  ऑफिसमध्ये आले होते. त्यांनी सांगितले की ते दोघेही घटस्फोटित आहेत आणि त्या महिलेला पहिल्या  लग्नापासून एक  मुलगा   आहे,  आणि  सध्या ते लिव्ह-इन मध्ये राहत असून लवकरच ते लग्न करणार आहेत. पण आता जर दुसरे लग्न झाले तर पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला होणाऱ्या नवऱ्याच्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळेल का ? किंवा पहिले लग्न झाले तेव्हा जी काही मिळकत त्या महिलेने घेतली असेल तिच्यावर तिच्या आधीच्या नवऱ्याचा हक्क राहील का होणाऱ्या नवऱ्याचा   ? असे अनेक  प्रश्न त्यांच्यापुढे होते.  त्यांच्याशी बोलताना हे जाणवले की आधीच्या आयुष्यातील कटू अनुभवांमुळे पुढील पावले उचलण्याआधी  त्यांना काही गोष्टीत भावनांच्या आहारी न जाता स्पष्टता   हवी होती.  सध्याच्या काळ बदलला आहे.    आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते की "विस्कटलेला संसार चालू ठेवायचा का घटस्फोट घेऊन मोकळे व्हायचे".    पूर्वी  दूरवर कोणाच्या तरी बाबतीत घडणारा डिव्होर्स हा त्याचे "टॅबूपण" सोडून आपल्या द...

अविवाहित स्त्री- पुरुषांच्या मिळकतीचे विभाजन कसे होते ? #लोकमत *ॲड.रोहित एरंडे.©*

 अविवाहित स्त्री- पुरुषांच्या मिळकतीचे विभाजन कसे होते ? #लोकमत *ॲड.रोहित एरंडे.©*  ज्येष्ठ नागरिक असलेले एक पुरुष आणि महिला ऑफिस  मध्ये आल्या होत्या. काय काम आहे, असे विचारल्यावर ते गृहस्थ म्हणाले, "सर, आम्ही दोघे सख्खे बहीण भाऊ आहोत आणि दोघेही अविवाहित आहोत, आई वडील जाऊन बरीच वर्षे झाली, त्यांची मिळकत आमच्या दोघांच्या नावावर झाली आहेच आणि आम्ही दोघेही ४-५ वर्षांपूर्वी बँकेमधून निवृत्त झालो आहोत. पण आता आम्हाला आमच्या प्रॉपर्टी, बँक खाती यांची व्यवस्था कशी लावावी हे समजत नाही"..  सामान्यपणे लग्न झालेले जोडपे आले की त्यांना त्यांच्या  मिळकतीचे काय करायचे आहे हे ठरलेले असते. उदा.नवरा बायको एकमेकांनाच मिळकत देतात किंवा मुलांना /नातवंडाना देतात , असा पॅटर्न प्रत्येक घरातील पार्श्वभूमीवर ठरतो. अर्थात असेच करायला पाहिजे असे काही नसते, स्वकष्टार्जित मिळकतीचे काय करायचे हे ठरविण्याचा जो तो मुखत्यार असतो.  तर एखादी मिळकत नावावरहोणे  म्हणजेच त्यामधील मालकी हक्क मिळणे हे त्या व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या न...

शबरीमला पुनर्विचार याचिका प्रकरण (Review Petition) – नक्की काय आहे ? ॲड. रोहित एरंडे ©

  शबरीमला पुनर्विचार याचिका  प्रकरण    (Review Petition) – नक्की काय आहे ?  ॲड. रोहित एरंडे © अनेकांनी या विषयावर लिहिण्याची इच्छा व्यक्त केल्याने हा विषय थोडक्यात सांगण्याचा हा प्रयत्न.  शबरीमालाची पार्श्वभूमी :  केरळमधील शबरीमला मंदिर सुमारे  ८०० वर्षांपूर्वी राजा राजशेखर याने बांधल्याचे मानले जाते.  भगवान अय्यप्पा यांचे निवासस्थान मानले गेलेले (भगवान शिव आणि मोहिनी यांचा पुत्र) यांना समर्पित हे  सोन्याचा मुलामा दिलेल्या पायऱ्या असलेले मंदिर पठाणमथिट्टा जिल्ह्यातील पेरियार व्याघ्र प्रकल्पात स्थित असून, मकर संक्रांतीच्या वेळी येथे 'मकरविलक्कू' (ज्योत) पाहण्यासाठी जगभरातून भाविक येतात.  या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी परंपरागत काही चाली रीती पाळल्या जातात. यामधील प्रमुख अट आहे की भगवान अय्यप्पा हे ब्रह्मचारी असल्याने वय वर्षे १० ते ५० या वयोगटातील महिलांना (थोडक्यात मासिक पाळीच्या वयातील महिलांना ) प्रवेश बंदी होती आणि ही प्रथा काहीशे वर्षे चालू होती.  २०१८ मध्ये काय झाले ? २०१८ मध्ये इंडियन यंग लॉयर्स असोशिएशन या संस्थेन...