" खड्ड्यात खरोखर जग जगते". ॲड. रोहित एरंडे ©
" खड्ड्यात खरोखर जग जगते".: ॲड. रोहित एरंडे © एखादा बळी गेल्याशिवाय आपल्याकडे यंत्रणांना जाग येत नाही असे म्हणतात. पुण्यामध्ये मागील आठवड्यात खड्ड्यामुळे एका १० वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला तर तर मागील महिन्यात मुंबई-नाशिक महामार्गावर भारंगी नदीच्या पुलाजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलाचे (TDRF) जवान विकास लहू गोरे यांचा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. आपत्कालीन परिस्थितीत अनेकांचे प्राण वाचवणारे हे जवानच स्वतः जीवघेण्या खड्ड्याचे बळी ठरले या सारखा दुसरा दैवदुर्विलास नसेल. अशी अनेक उदाहरणे आहेत. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते अशी काही ठिकाणी परिस्थिती आहे. " मरणात खरोखर जग जगते, आधी मरण अमरपण ये मग ते" असे राजकवी भा.रा. तांबे म्हणून गेले आहेत. परंतु एकंदरीतच सध्या रस्त्यांची जी काही चाळण झाली आहे आणि जिकडे तिकडे खड्डेच खड्डे झाले आहेत, त्यावरून वरील ओळींमध्ये भा. रा. तांब्यांची माफी मागून, थोडासा बदल करावासा वाटतो '" खड्ड्यात खरोखर जग जगते, आपोआप अपघाती मरण ये मग ते". आपल्या राज्य...