"क्लेम अर्ज दाखल करण्यास उशीर झाला केवळ ह्या कारणाकरिता नुकसान भरपाईसाठीचा किंवा गाडी चोरी झाल्यानंतरचा इन्शुरन्स क्लेम फेटाळता येणार नाही - मा. सर्वोच्च न्यायालय " - ऍड. रोहित एरंडे
*इन्शुरन्स कंपन्यांना वेळेचे महत्व समजावणारे "सर्वोच्च" निकाल * *क्लेम दाखल करण्यास ' उशीर' झाला केवळ ह्या कारणाकरिता क्लेम फेटाळणे चुकीचे. उशीर होण्या मागचे कारण " खरे " असणे महत्त्वाचे :* ऍड. रोहित एरंडे. © हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात जनरल आणि वैदयकिय इन्शुरन्स पॉलीसि असणे गरजेचे झाले आहे. चोरी, आग लागणे, पूर येणे यामुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून अश्या जनरल इन्शुरन्स पॉलीसि मदतीचा हात देतात. पण समजा प्रचंड पाऊस पडल्यामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठीचा किंवा गाडी चोरी झाल्यानंतरचा क्लेम केवळ दाखल करण्यास उशीर झाला ह्या कारणाकरिता फेटाळता येईल का असे प्रश्न मा. सर्वोच्च न्यायालयापुढे २ वेगळ्या याचिकांच्या निमिताने उपस्थित झाले. पहिला झटका सर्वोच्च न्यायालयाने दिला नॅशनल इन्शुरन्स कंपनीला. (निकाल तारीख ७/०४/२०१७). घटना आहे १९९२ सालातील . ६ ऑगस्ट १९९२ रोजी झालेल्या प्रचंड पावसामुळे हिंदुस्तान सेफ्टी गॅस वर्क्स लि या अर्जदार कंपनीच्या कच्च्...