Posts

Showing posts from December 20, 2019

वडिलोपार्जित मिळकतीमधील मुलींचे हक्क : कायद्याचा वनवास कधी संपणार ? ऍड रोहित एरंडे ©

वडिलोपार्जित मिळकतीमधील  मुलींचे  हक्क : कायद्याचा   वनवास कधी संपणार ?  ऍड रोहित एरंडे © वडिलोपार्जित मिळकतींमध्ये मुलींचा हक्क आहे का हो , असा प्रश्न पक्षकारांनी  वकीलांना विचारल्यावर, १४ वर्षे झाली तरी ह्या तरतुदींचा अजून वनवास संपला नाही असे उत्तर द्यावेसे वाटते. "कायद्यापुढे सर्व समान" ह्या मूलभूत तत्वाला अनुसरून केंद्र सरकारने हिंदू  वारसा कायदा -१९५६, मध्ये २००५  साली विविध दुरुस्त्या करून  वडिलोपार्जित मिळकतींमध्ये मुलांना आणि मुलींना समान हक्क मिळण्यासाठी कलम  ६ मध्ये महत्वाचे फेरबदल केले आणि ही   दुरुस्ती अंमलात येण्यासाठी ०९/०९/२००५ हि तारीख मुक्रर केली गेली.   तसेच दुरुस्त कलम ६(५) प्रमाणे २०/१२/२००४ पूर्वी जर एखादी  मिळकत खरेदी, गहाण,बक्षिसपत्र, हक्कसोड पत्र , मृत्यूपत्र इ. दस्तांनी कायदेशीरपणे   किंवा रजिस्टर्ड वाटपपत्राने किंवा कोर्टाच्या हुकूमनाम्याने तबदील झाली असेल, तर अश्या मिळकतींमध्ये मुलींना सामान हक्क मिळणार नाही असे हि नमूद केले. . मात्र  कायदा दुरुस्ती होऊन१४ वर्षे झाली तरी   ह्या दुरुस्तीचा अंमल हा पूर्वलक्षी प्रभावाने (रिट्रोस्पेक्टिव्ह )