Posts

Showing posts from August 1, 2022

" खड्ड्यात खरोखर जग जगते".ॲड. रोहित एरंडे ©

 " खड्ड्यात खरोखर जग जगते". ॲड. रोहित एरंडे © " मरणात खरोखर जग जगते, आधी मरण अमरपण ये मग ते"  असे राजकवी भा.रा. तांबे म्हणून गेले आहेत. परंतु सध्या रस्त्यांची जी काही चाळण झाली आहे आणि जिकडे तिकडे खड्डेच खड्डे झाले आहेत, त्यावरून वरील ओळींमध्ये भा. रा. तांब्यांची माफी मागून, थोडासा बदल करावासा वाटतो '" खड्ड्यात खरोखर जग जगते, आपोआप अपघाती मरण  ये मग ते". कायदा पुस्तकात आहे,पण अंमलबजावणी नाही ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. आपल्या राज्य घटनेतील कलम २१ प्रमाणे नागरिकांना काही मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहेत. हे कलम घटनेचा पाया आहे, ज्याला धक्का लावता येत नाही. ह्या अधिकारामध्ये  शुद्ध हवा, पिण्यायोग्य पाणी, ध्वनी आणि प्रदूषणमुक्त वातावरण, चालण्यायोग्य रस्ते, ' राइट टू प्रायव्हसी अशा अनेक अधिकारांचा समावेश सर्वोच्च न्यायालयाने वेळीवेळी केला आहे.   सध्या एकंदरीत गल्ली असो वा महामार्ग, रस्त्यांची जी दुर्दशा झाली आहे त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे. अश्या वेळी नगरपालिकांना आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देणाऱ्या मा. सर्वोच्च न्यायालयाच

देशद्रोह आणि कायदा... लोकमान्य टिळक स्मृती दिनानिमित्ताने ऍड. रोहित एरंडे ©

 देशद्रोह आणि कायदा... लोकमान्य टिळक स्मृती दिनानिमित्ताने  ऍड. रोहित एरंडे ©  ब्रिटिशांविरुद्ध सुरुकेलेल्या भारतीय असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्य टिळकांचा आज स्मृतीदिन. लो. टिळक म्हटले की आठवतात त्यांनी बाणेदारपणे लढा दिलेले महत्वपूर्ण खटले. त्यातले २ खटले हे देशद्रोहाच्या गुन्ह्या बद्दल आहेत. देशद्रोहाचे हे कलम आजही वादाच्या फुलबाज्या उडविते. काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ह्या कलमाला स्थगिती दिली असली, तरीही आजच्या दिवसाच्या निमित्ताने, ह्या कलमाची थोडक्यात माहिती आपण घेवू... कायद्याची पार्शवभूमी : लो. टिळकांचा बाणेदारपणा  ब्रिटिशांनी १८६० साली भारतीय दंडविधान संहिता म्हणजेच आयपीसी अंमलात आणला आणि त्यामध्ये १८७४ साली दुरुस्ती करून 'देशद्रोह' म्हणजेच 'सिडीशन' ह्या गुन्ह्याचा अंतर्भाव केला.  "जी व्यक्ती लिखित अथवा तोंडी शब्दांद्वारे किंवा अन्य प्रकारे सरकारविषयी चीड, अवमान किंवा अप्रिती निर्माण करेल किंवा तास प्रयत्न करेल, तर अश्या व्यक्तीला ३ वर्षे कैद आणि अथवा दंड अशी शिक्षा देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध झाल्यासहोऊ शकते" अशी कलम १२४-अ मध्ये तरतूद आह