१२ वर्षानंतर भाडेकरू आपोआप मालक होत नाही. . : ॲड. रोहित एरंडे ©
"१२ वर्षे किंवा कितीहि काळ राहिले म्हणून भाडेकरू काही मालक होत नाही. ऍड. रोहित एरंडे © आमच्या वाड्यामध्ये ४-५ भाडेकरू गेले ६०-७० वर्षांपासून आहेत. त्यातले बहुतेक जण आता दुसरीकडे जागा घेऊन राहतात. मला जागेची नितांत गरज आहे म्हणून ताबा मागितला तर मला सांगतात कि आता १२ वर्षांपेक्षा जास्त काळ ते भाडेकरू राहिल्यामुळे आता तेच त्यांच्या जागेचे मालक झाले आहेत आणि तसे युट्युब -व्हाट्सऍप वर एका व्हिडिओ मध्ये पण दाखवले आहे म्हणे. हे खरे आहे का ? असे असेल तर आम्ही घरमालकांनी कुठे दाद मागायची. ? एक वाडामालक, पुणे. सर्व प्रथम सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या अनेकोत्तम शुभेच्छा. या प्रश्नाच्या निमित्ताने नवीन वर्षात व्हाट्सऍप , युट्युब वर आलेल्या बातम्यांवर अंधपणे विश्वास ठेवणार नाही असा पण नवीन सर्वांनी करूयात असे नमूद करावेसे वाटते. आता वळूयात तुमच्या महत्वाच्या प्रश्नाकडे. बरेच जणांना असे वाटते कि १२ वर्षांपेक्षा जास्त काळ भाडेकरू राहिला कि तो आपोआप मालकच होतो. असे जर असते तर आत्तापर्यन्त भारतभर हाहाकार उडाला असता !. हा जो काही १२ ...