मॅरॅथॉन आणि पावनखिंड १२ जुलै १६६०.. - ऍड. रोहित एरंडे ©
मॅरॅथॉन आणि पावनखिंड १२ जुलै १६६०..
आपल्याला प्रश्न कदाचित पडेल की मॅरॅथॉन आणि पावनखिंड ह्यांचा काय संबंध ?
सध्या मॅरॅथॉन स्पर्धेमध्ये पळण्याचे प्रमाण लोकांमध्ये वाढले आहे. फिटनेस बाबत लोक जागरूक झाल्याचे हे चिन्ह आहे. पण मॅरॅथॉन हा शब्द कुठून आला, ह्याचा शोध घेतला असता इंटरनेट वर माहिती मिळाली ती अशी, की सुमारे ५ व्या शतकात प्राचीन ग्रीस मध्ये मॅरॅथॉन नावाचे एक गाव होते. ह्या गावी रोमन्स आणि पर्शियनस ह्यांच्यातील युद्धामध्ये रोमन्स विजयी झाले आणि ही बातमी अथेन्स येथे पोहोचविण्यासाठी ग्रीक निरोप्या - फिलीपेडस, हा मॅरॅथॉन ते अथेन्स हे सुमारे २५-२६ मैल म्हणजेच सुमारे ४२ किमी हे अंतर पळाला आणि बातमी सांगून तत्क्षणी गतप्राण झाला. त्यामुळे ह्या अंतराची पळण्याची जी स्पर्धा पुढे सुरू झाली त्याला मॅरॅथॉन म्हणून ओळखले जावू लागले. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये देखील ह्या क्रीडा प्रकाराला स्थान मिळाले.
.
मॅरॅथॉन आणि पावनखिंड १२ जुलै १६६०..
१२ जुलै १६६० ह्या दिवशी आषाढ पौर्णिमा होती. पाऊस प्रचंड होता आणि अश्या किर्र रात्री बाजीप्रभु देशपांडे बांदल आणि त्यांचे शूर सहकारी मावळे आपल्या महाराजांसाठी जीवावर उदार होवून, पायाखाली दगड धोंडे, नदी नाले, विंचू काटा तुडवत पन्हाळ्यापासून जे पळत होते ते घोडखिंडीपर्यंत सुमारे तब्बल ५४ किमी चे अंतर कापून थांबले आणि अजरामर असा रणसंग्राम केला आणि घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे सार्थ केले .
आपल्याला पन्हाळा - पावनखिंड असा पायी प्रवास , ते सुद्धा,पायात बूट , अंगात रेनकोट, प्यायला पाणी, खायला अन्न एवढ्या सोयींनी सुद्धा जमणे कष्टप्रद आहे.
नवीन पिढीला मॅरॅथॉनची माहिती असेल किंवा नसेल पण पावनखिंडीबद्दल जरूर माहिती करून द्या.
ॲड. रोहित एरंडे.©
Comments
Post a Comment