Posts

"तो हक्क" सर्वस्वी महिलांचाच : ॲड. रोहित एरंडे ©

"विवाहित असो वा लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या , मूल होऊ द्यायचे की नाही हा निर्णय  सर्वस्वी महिलांचाच." "प्रसूती -नॉर्मल का सिझेरिअन हाही हक्क महिलांचाच.. "अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार" ऍड. रोहित एरंडे. ©    "सकाळ मनी" च्या माध्यमातून  आर्थिक साक्षरतेचे महत्त्व वेळोवेळी आपल्याला समजत असते.  कोव्हीड नंतर उद्भवलेल्या परिस्थितीमधून धडा घेऊन "सकाळ मनी" च्या माध्यमातून "महिलांनो  आर्थिक साक्षर बना " या लेखातून  मी डिसेंबर २०२३ च्या अंकामध्ये महिलांनी स्वतःचे आथिर्क निर्णय घेण्याचे शिकणे  का महत्वाचे आहे ते नमूद केले होते.  असो. पण म्हणतात ना विरोधाभास हे आपल्या संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. कारण  एकीकडे महिला दिनाचे कौतुक करायचे, किंवा नवरात्रामध्ये देवीचे रूप म्हणून 'उदो उदो' करायचे आणि दुसरीकडे महिलांनी   मूल  जन्माला घालायचे का  नाही आणि ठरवले  तर प्रसूती कुठल्या पध्दतीने व्हावी, यावर आपला काहीही संबंध नसताना  पु.ल. म्हणायचे तसे "मत ' ठोकून द्यायचे  असे प्रकार दिसून येतात आणि यामध्ये महिलावर्ग...

लिव्ह-इन रिलेशनशिप आणि मिळकतीमधील हक्क : ॲड. रोहित एरंडे ©

 लिव्ह-इन रिलेशनशिप आणि मिळकतीमधील हक्क : मी आणि माझी मैत्रीण लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये गेले १-२ वर्षे  माझ्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राहत आहोत. आता आमची बिल्डिंग  रिडेव्हलपमेंटला  जाण्यासंबंधी बोलणी चालू आहेत. तर या जुन्या किंवा नवीन मिळणाऱ्या  फ्लॅट मध्ये तिला मालकी हक्क राहील काय ? एक वाचक, पुणे.  आपला प्रश्न हा असाधारण - युनिक असा आहे. रिडेव्हलपमेंट करताना किती वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. लिव्ह-इन रिलेशनशिप हा प्रकार आता आपल्याकडे काही नवीन नाही आणि एखादी गोष्ट कोणाला अनैतिक वाटली तरी ती बेकायदेशीर असलेच असेही नाही. दोन सज्ञान  भिन्नलिंगी पण अविवाहित व्यक्तींनी लग्नासारखे एकत्र राहणे म्हणजे लिव्ह-इन-रिलेशन असे व्याख्या हा विषय माहिती नसणाऱ्यांसाठी करता येईल. आता सध्याचा फ्लॅट तुमच्या नावावर असल्यामुळे जो नवीन फ्लॅट  रिडेव्हलपमेंट नंतर मिळेल तो सुध्दा तुम्हा एकट्याच्याच नावावर होईल. हा खूप महत्वाचा प्रश्न अनेक वाचकांना पडतो. बऱ्याच जणांना असे वाटत असते कि नवीन फ्लॅटवर मुला-मुलीचे किंवा वैवाहिक जोडीदाराचे नाव घ...

"लाईफ इन्शुरन्स पॉलिसी धारकांना सर्वोच्च दिलासा" : ॲड. रोहित एरंडे ©

"लाईफ इन्शुरन्स पॉलिसी धारकांना सर्वोच्च दिलासा"   ॲड. रोहित एरंडे © लाईफ इन्शुरन्स पॉलिसी - जीवन विमा  याकडे बहुतांशी मध्यमवर्गीय लोक एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून बघत आले आहेत.    "योगक्षेमं वहाम्यहम्" हा भगवद्गीतेतील २२व्या अध्यायातील एक श्लोक आहे जो जीवन विमा क्षेत्रामधील अग्रणी असलेल्या एलआयसी चे ब्रीदवाक्य आहे. या श्लोकात भगवंत असे सांगतात  की, "जे लोक अढळ श्रद्धेने मला मनापासून शरण जातात त्यांच्या कल्याणाची आणि संरक्षणाची मी वैयक्तिकरित्या काळजी घेतो" तद्वत  जीवन विमा पॉलिसी घेतल्यावर पॉलिसी  करारानुसार, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर किंवा निश्चित कालावधीनंतर विमा कंपनी पॉलिसीधारकाला किंवा त्याच्या  नामांकित लाभार्थ्यांना विम्याची रक्कम देते. या बदल्यात, पॉलिसीधारक विमा कंपनीला प्रीमियम भरतो. आता वेगवेगळ्या कंपन्या देखील या क्षेत्रात उतरल्या आहेत आई र्पत्येक व्यक्ती त्याच्या कुवतीनुसार वेगवेगळ्या कंपन्यांच्या पॉलिसी घेऊ शकतो. मात्र अशी पहिली पॉलिसी असताना त्याची माहिती दुसऱ्या कंपनीची पॉलिसी घेताना दिली गेली नाही, तर या कारणास्तव  पॉलि...

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तारतम्य "जनी वावगे बोलता सुख नाही" अभिव्यक्ती स्वातंत्र्य - "तुमचे आमचे सेम असते" ऍड. रोहित एरंडे ©

   अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तारतम्य  "जनी वावगे बोलता सुख नाही" अभिव्यक्ती स्वातंत्र्य - "तुमचे आमचे सेम असते"  ऍड. रोहित एरंडे © अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मंगेश पाडगावकर म्हणतात तसे "तुमचे आमचे सेम असते".  आपल्याला पाहिजे तेव्हा स्वातंत्र्य आणि त्याचवेळी ते दुसऱ्याला नाही, असे "सोयीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य" होऊ शकत नाही. आपण केलेली ती निकोप टीका आणि दुसऱ्याने केलेली असभ्य टीका हे ठरविण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी "आपणास चिमोटा घेतला ।तेणें कासाविस जाला । आपणावरून दुस-याला ।राखत जावे ।। कठिण शब्दें वाईट वाटतें । हें तों प्रत्ययास येतें । तरी मग वाईट बोलावें तें । कायें निमित्य ।।" हे दासबोधातील वचनच उत्तर ठरावे. युट्यूबर रणवीर अलाहाबादियानं केलेलं एक वक्तव्य वादाचं केंद्र बनलं आहे आणि त्याच्यावर भारतात विविध ठिकाणी एफआयआर दाखल झाले आहेत आणि  सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे आणि "या अत्यंत महत्वाच्या" पिटिशनवर लगेचच सुनावणी देखील होऊ शकते. त्याच्या शो  दरम्यान त्यानं एका स्पर्धकाला त्याच्या पालकांच्या वैयक्तिक नात्...

"सर्वात शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते" _ ॲड. रोहित एरंडे ©

"सर्वात  शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते"  मी माझे मृत्युपत्र सुमारे १० वर्षांपूर्वी करून ठेवले आहे आणि मृत्युपत्राने माझी मिळकत माझ्या दोन्ही मुलांना समान पध्दतीने दिली होती, मुलीला मात्र काहीही दिले नव्हते कारण तिच्या लग्नात तिला जे द्यायचे ते मी आणि माझ्या पत्नीने दिले होते.   मात्र आता परिस्थितीमध्ये बराच बदल झाला असून मला मुलांना काहीही द्यायची इच्छा नसून  सर्व माझ्या मुलीला द्यायचे आहे. तर मला आता नवीन मृत्युपत्र करता येईल का ? त्यास मुले आक्षेप घेऊ शकतील का ? एक वाचक, पुणे.  खरेदिखत, बक्षिस पत्र, हक्कसोड पत्र  इ. दस्त   एकदा अंमलात आले कि ते परत बदलता येत नाहीत, पण मृत्युपत्र हा असा एकमेव दस्त आहे कि तो कितीवेळा बदलता येतो आणि सर्वात शेवटचे मृत्युपत्र हे कायद्याने ग्राह्य धरले जाते (संदर्भ : के. अम्बुनी वि. एच. गणेश भंडारी  AIR 1995 SC 2491),. कारण मृत्युपत्राची अंमल हा मृत्यूपत्रकरणारा मयत झाला कि मगच सुरु होतो. आपल्या हयातीमध्ये आपण मृत्युपत्र करून ठेवले असले तरी जो पर्यंत आपण जिवंत आहोत तो पर्यंत मृत्यूपत्र म्हणजे फक्त एक क...

मृत्युपत्रात काय लिहिले आहे याची पूर्वकल्पना मुलांना द्यावी काय ? - ॲड. रोहित एरंडे ©

 मृत्युपत्रात काय लिहिले आहे याची पूर्वकल्पना मुलांना द्यावी काय ? सर, आम्ही आमच्या प्रॉपर्टीचे मृत्युपत्र करून ठेवणार आहोत आणि याची चर्चा आम्ही मुलांसमोर केली. तर आता   आमची २ मुले त्यांना  मृत्युपत्रामध्ये  काय लिहून ठेवावे आणि मृत्युपत्र केल्यावर ते वाचायला मागत आहेत. तर अशी  माहिती कायद्याने सांगावी काय ? आम्हाला या सर्वाचा  ताण येऊन राहिला आहे.  एक वाचक, नागपूर.  तुम्ही विचारले तशी परिस्थिती कमी अधिक फरकाने बघायला मिळते आणि बऱ्याचदा पालकांची भावनिक स्थिती दोलायमान होते. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारून अनेक पालकांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे असे म्हणता येईल. एकतर मृत्युपत्र हा  अनेकांना मृत्युपत्राला दुसरे नाव इच्छापत्र असे हि आहे म्हणजेच मृत्यूपत्र करणाऱ्याच्या इच्छेने केली जाणारी मिळकतीची विभागणी, त्यामुळे मुलांच्या इच्छेने मृत्युपत्र केल्यास त्याला तुमचे इच्छापत्र कसे म्हणता येईल ? एकत्र कायद्यामध्ये मृत्युपत्र करण्याची पूर्वकल्पना मुलांना (लाभार्थी) द्यावी अशी कुठलीही तरतूद नाही आणि प्रत्येक मुलाला/मुलीला  ...

अविवाहित महिला आणि मिळकतीची विभागणी : ॲड. रोहित एरंडे ©

   अविवाहित महिला आणि मिळकतीची विभागणी :  नमस्ते , मी एक अविवाहित महिला आहे. मी  आणि माझे आई-वडील  आम्ही एकत्र सुखाने रहात  आहोत.  मी नोकरी करून पैश्यातून काही स्थावर जंगम प्रॉपर्टी कमावली आहे. माझे मृत्युनंतर माझी मिळकत कोणाला मिळेल ? मृत्युपत्र करणे कायद्याने मँडेटरी आहे का ? एक वाचक,   हिंदू वारसा कायद्याप्रमाणे  पुरुष आणि महिला यांच्या मिळकतीची त्यांच्या मृत्युपश्चात विभागणी वेगळ्या पद्धतीने होते. आपल्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी एक समजून घेऊ की एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा आपल्या  हयातीमध्ये हवा असेल तर  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच दिला -घेतला जाऊ शकतो. तर   एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन )  तबदील होऊ शकतो. खरेदीखत, बक्षीसपत्र , मृत्युपत्र  ह्यायोगे मिळालेली मिळकत हि त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित / स्वतंत्र मिळकत धरली जाते. ...

फ्लॅटवरील कर्ज आणि रिडेव्हलपेमेंटसाठी बँकेची संमती . : ॲड. रोहित एरंडे

फ्लॅटवरील  कर्ज आणि  रिडेव्हलपेमेंटसाठी बँकेची  संमती .  आमच्या  सोसायटीची  रिडेव्हलपेमेंट प्रोसेस सुरु झाली आहे आणि आता डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट रजिस्टर होणार आहे. मी माझा फ्लॅट तारण ठेवून एका बँकेकडून रितसर कर्ज घेतले आहे. बिल्डर आणि सोसायटीने मला त्या बँकेचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC ) आणण्यास सांगितले आहे. मात्र मी अनेकवेळा विनवण्या करूनही बँक NOC देण्यास टाळाटाळ करत आहे आणि आता सोसायटीवालेही   मलाच दोष देत आहेत . अश्या परिस्थितीत काय करता येईल ? एक त्रस्त सभासद,  पुणे.  रिडेव्हलपेमेंट (पुनर्विकास) मध्ये निर्माण  होणारे प्रश्न बघता  त्यासाठी एक सर्वसमावेशक  कायदा बनविण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या फ्लॅटचे " टायटल" निर्वेध आणि निजोखमी  आहे अशी कबुली  प्रत्येक सभासदाकडून बिल्डर लिहून घेतो. कारण बहुतेक रिडेव्हलपेमेंटमध्ये   कुठल्यातरी सभासदांनी फ्लॅटवर कर्ज घेतलेले असते, असे दिसून येते आणि  जर कर्ज असेल तर   त्यावर बँकेचा चार्ज रहात असल्यामुळे कर्ज फिटेपर्यंत  फ्लॅट ट्रान्सफर संदर्भात कुठ...

पार्किंग नियमावली ठरविण्याचे अधिकार जनरल बॉडीला - ॲड. रोहित एरंडे ©

पार्किंग नियमावली  ठरविण्याचे अधिकार जनरल बॉडीला - ॲड. रोहित एरंडे © आमच्या सोसायटीमध्ये  दोन विंग मध्ये १८ फ्लॅट + ३ दुकाने असून एकूण १८ सदस्यांपैकी १४ सदस्य त्यांच्या दुचाकी इथे पार्क करीत असत. २०११ मधील जनरल बॉडीच्या एका  ठरावानुसार  पार्किंग चार्जेस घेत होते. मात्र, पार्किंग योग्य नाही, गाड्यां सुरक्षा नाही म्हणून काही सदस्यांनी पार्किंग चार्जेस देणे बंद केले आणि मॅनेजिंग कमिटीने तसा  ठराव २०२१ मध्ये पारित केला. बाकीचे सदस्य पार्किंग चार्जेस सुरु करून थकीत चार्जेस घ्या अशी मागणी  करत आहेत, पण कमिटी काही दाद देत नाही. तर याबाबत काय  करता येईल ?  एक वाचक, नेरूळ, नवी मुंबई    कितीही दिले तरी कमीच असे पार्किंग बद्दल बोलले जाते आणि सभासदांचे एकमेकांशी संबंध बिघडवण्यास पार्किंग निमित्त ठरल्याचे बरेचदा दिसून येते. बायलॉज (उपविधी) क्र. ७८-८४  प्रमाणे मोकळ्या जागेतील  पार्किंगचे नियम ठरविण्याचे अधिकार जनरल बॉडीला आहेत, मॅनेजिंग कमिटीला नाहीत, पण जनरल बॉडीने केलेल्या नियमांची अंमलबजावणी करून घेणे हे कमिटीच्या अखत्यारीत येते....

पुनर्विकास आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न . ॲड. रोहित एरंडे ©

पुनर्विकास आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न .. ॲड. रोहित एरंडे © आमच्या  सोसायटीला सुमारे ४० वर्षे झाली आहेत. बिल्डिंग उत्तम आहे, काही ज्येष्ठ नागरिक वगळता  बहुतांशी  सभासदांना   Redevelopment    करायचे आहे. ज्येष्ठ नागरिकांना या वयात दुसरी जागा शोधणे आणि किती काळ पर्यायी जागेत रहावे लागेल  आणि  बिल्डरने फसवले  किंवा प्रोजेक्ट फसले  तर काय याचे टेन्शन येते.   अश्या ज्येष्ठ सभासदांना  तर Redevelopment केले आणि नाही केले  याचे फायदे तोटे कसे समजावावेत ? असेच प्रश्न आमच्या मित्रांच्या सोसायटीमध्ये पण येत आहेत . एक वाचक, पुणे    एकीकडे  पुनर्विकास प्रक्रियेमध्ये  तरुणांच्याही  पुढे होऊन सगळी धावपळ करत असणारे ज्येष्ठ सभासद  आणि दुसरीकडे तुमचा प्रश्न असे परस्पर विरोधी  चित्र  सध्या दिसून येते आअमुक इतकी वर्षे झाल्यावरच पुनर्विकास करता येतो किंवा करावाच  असा काही कायदा नाही.  प्रत्येक बिल्डिंगची स्थिती, सभासदांचे प्रश्न आणि त्याची तीव्रता देखील वेगवेगळी असते. तुमची सोसायटी असल्यामुळे...

ऑनलाईन फ्रॉड : खातेदारांना "सर्वोच्च" दिलासा आणि बँकेला दणका ! ॲड. रोहित एरंडे ©

  ऑनलाईन फ्रॉड   : खातेदारांना "सर्वोच्च"  दिलासा आणि बँकेला दणका  !  ॲड. रोहित एरंडे © गेल्या काही वर्षांमध्ये अनेक व्यवसायांचं आणि व्यवहारांचे स्वरूप बदललं आहे. ऑनलाईन हा परवलीचा शब्द झाला आहे. रस्त्यावर वस्तू विक्री करणाऱ्यांपासून ते बँकांचे व्यवहार ऑनलाईन माध्यमातून होत आहेत. यामध्ये बरेचदा कमी किंमतीमध्ये ब्रँडेड वासू मिळतात या लोभापायी लोकं अनोळखी वेबसाईटवर जातात आणि "अति लोभ त्यास क्षोभ होईल जाणा " हे रामदास स्वामींच्या वचनाचा प्रत्यय येतो.   सोयी तितक्या  गैरसोयी असे आपल्याकडे म्हणतात त्याप्रमाणे "वन क्लिक अवे " च्या  जमान्यात अशी  घटना  घडल्यावर, ,   कोणताही  खातेदार अगदी हतबल होऊन जातो कारण काही कळायच्या आत पैसे गेलेले असतात.  बऱ्याचदा बँक  खातेदार  अनावधानाने अश्या फ्रॉडचे बळी पडतात. पण जेव्हा एखादा असा गैरप्रकार घडतो ज्यात  खातेदाराची किंवा बँकेची चूक नसते,  तरीही अशी गेलेली रक्कम भरून देण्याची जबाबदारी बँकेची असते का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे नुकताच उपस्थित झाला. गुह...

व्यक्ती बेपत्ता ? सात वर्षे थांबा ! - ॲड. रोहित एरंडे ©

व्यक्ती बेपत्ता ,  मग ७ वर्षे थांबा !! ॲड. रोहित एरंडे. © एखादी व्यक्ती बेपत्ता असेल, म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा काहीही थांगपत्ता लागत नसेल किंवा ती व्यक्ती परांगदा झाली असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आपल्याला कल्पनाही येणार नाही अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये मानसिक त्रास तर असतोच, पण विविध कायदेशीर प्रश्नांना सामोरे जावे लागते. ह्या संबंधातील (अपुऱ्या ) कायदेशीर तरतुदी काय आहेत ह्याची थोडक्यात माहिती घेवू. हरविलेला भाऊ किंवा नातलग एखाद्या नाट्यमय घटनेनंतर गायब होतो आणि अनेक वर्षांनंतर अवतीर्ण होतो तो हिंदी चित्रपटातच, पण वास्तवात मात्र फार क्वचितच असे घटते आणि त्या बेपत्ता व्यक्तीचे नातलग मात्र संभ्रमात राहतात. *बेपत्ता व्यक्ती 'मृत' घोषीत करण्यासाठी त्या व्यक्तीबद्दल ७ वर्षे काहीही माहिती नाही, हे सिद्ध करावे लागते.* एखादी व्यक्ती खूप दिवसांपासून बेपत्ता असेल किंवा पूर, भूकंप सारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये सापडून ज्यांचा काहीच थांगपत्ता लागत नाही, अशा वेळी त्या बेपत्ता व्यक्तींना मृत मानायचे की नाही असा यक्षप्रश्न उभा राहतो. कारण अशा बेपत्ता व्यक...

वडिलोपार्जित मिळकतीमध्ये बहिणींना समान हक्क : ॲड. रोहित एरंडे ©

वडिलोपार्जित मिळकतीमध्ये   बहिणींना  समान हक्क :   ॲड. रोहित एरंडे ©   वडिलोपार्जित मिळकतीमध्ये   बहिणींना  समान हक्क :    आम्ही  एकूण  २ बहिणी आणि २ भाऊ. आमची काही  पिढ्यांपासूनची  वडिलोपार्जित मिळकत आहे. दोन्ही बहिणींचे   लग्न १९९४ पूर्वी झाले आहे आणि तरीही आता त्या मिळकतींमध्ये हक्क सांगत आहेत. त्यांना लग्नात सर्व काही दिले आहे आणि म्हणून आम्ही हक्कसोडपत्र मागत आहोत, तर त्याला त्या नकार देत आहेत. तर आता बहिणींना  आमच्या   वडिलोपार्जित मिळकतींमध्ये हक्क आहे का   ? एक वाचक, पुणे. बहीण-भावाचे खरे प्रेम हे भाऊबीजेला नाही तर सब-रजिस्ट्रार कचेरीत कळते असे कोर्टात गंमतीने म्हटले जाते.  कायद्याच्या अज्ञानाने नात्यामध्ये वितुष्ट कसे येऊ शकते  हे आपल्या प्रश्नावरून दिसून येते. वडिलोपार्जित (ancestral ) आणि वडिलार्जित (स्वकष्टार्जित)) या मिळकतीच्या हक्कांमध्ये खूप फरक आहे .  वडिलोपार्जित मिळकतींमध्ये  मुलींना मुलांप्रमाणेच  समान हक्क मिळण्यासाठी हिंदू वारसा कायदा १९५६ च्या कलम...

पुनर्विकास : वैयत्तिक हट्टापायी बहुमताला वेठीस धरणे दंडास पात्र. - मुंबई उच्च न्यायालय. ॲड. रोहित एरंडे ©

पुनर्विकास : वैयत्तिक हट्टापायी बहुमताला  वेठीस धरणे दंडास पात्र. -  मुंबई उच्च न्यायालय  ॲड. रोहित एरंडे © आमच्या सोसायटीची पुनर्विकास प्रक्रिया सुरु झाली. विशेष सभेमध्ये डेव्हलपरची  देखील बहुमताने निवड झाली आहे. परंतु ४० पैकी ३-४ सभासद आता काहीही कारणे काढून विरोध करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना जो बिल्डर हवा  होता त्याची नेमणूक होऊ शकली नाही. सोसायटीमधील बहुतांश सभासद आणि जे विरोध करीत आहेत ते सुध्दा आता जवळ जवळ ७० वर्षाच्या पुढे आहेत. त्यातील काही  सभासद मी फ्लॅटला आताच रंग दिला आहे, मी  नवीन फर्निचर केले आहे असे सांगून विरोध करीत आहेत.इतर सभासदांनी हात जोडून  विनंती केली तरी हे सभासद आपला हेका - इगो सोडत नाहीत.   अश्या सभासदांबाबत काही कायदेशीर कारवाई करता येईल का ? ज्येष्ठ सभासद, पुणे.  पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट)  आणि विरोध या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुठल्याही सोसायटीमध्ये सोसायटी सभासदांचा इगो किती मोठा आहे यावर सोसायटीची वाटचाल निर्वेधपणे चालेल कि नाही हे ठरते, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. रिडेव्हलपम...

१२ वर्षानंतर भाडेकरू आपोआप मालक होत नाही. . : ॲड. रोहित एरंडे ©

 "१२ वर्षे किंवा कितीहि  काळ राहिले म्हणून भाडेकरू काही  मालक होत नाही.    ऍड.  रोहित एरंडे ©  आमच्या वाड्यामध्ये ४-५ भाडेकरू गेले ६०-७० वर्षांपासून आहेत. त्यातले बहुतेक जण आता दुसरीकडे जागा घेऊन राहतात. मला जागेची नितांत गरज आहे म्हणून ताबा मागितला तर मला सांगतात कि आता १२ वर्षांपेक्षा जास्त काळ ते भाडेकरू राहिल्यामुळे आता तेच त्यांच्या जागेचे मालक झाले आहेत आणि तसे युट्युब -व्हाट्सऍप वर एका व्हिडिओ मध्ये पण दाखवले आहे म्हणे. हे खरे आहे का ? असे असेल तर आम्ही घरमालकांनी कुठे दाद मागायची. ? एक वाडामालक, पुणे.  सर्व प्रथम सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या अनेकोत्तम शुभेच्छा. या प्रश्नाच्या निमित्ताने नवीन वर्षात व्हाट्सऍप , युट्युब वर आलेल्या बातम्यांवर अंधपणे विश्वास ठेवणार नाही असा पण नवीन  सर्वांनी करूयात असे नमूद करावेसे वाटते.  आता वळूयात  तुमच्या महत्वाच्या प्रश्नाकडे. बरेच जणांना असे वाटते कि १२ वर्षांपेक्षा जास्त काळ भाडेकरू राहिला कि तो आपोआप मालकच होतो. असे जर असते तर आत्तापर्यन्त भारतभर हाहाकार उडाला असता !. हा जो काही १२ ...

प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावरच फेडरेशनची स्थापना करता येईल - मुंबई उच्च न्यायालय - ॲड. रोहित एरंडे ©

  प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावरच फेडरेशनची स्थापना करता येईल - मुंबई उच्च न्यायालय . ॲड. रोहित एरंडे © पूर्वी १- २ बिल्डिंग ची स्कीम असायची. मात्र अलीकडच्या काळात ५ पेक्षा जास्त बिल्डिंग किंबहुना टॉवर्स असलेले बांधकाम प्रकल्प असतात, कधी कधी स्वतंत्र रो-हाऊस . प्रत्येक बिल्डिंगचा मेंटेनन्स हा त्या त्या बिल्डिंगकडे असतो. परंतु अश्या मोठ्या  प्रकल्पांमध्ये क्लब हाऊस,  स्विमिंग टॅंक इ. सोयी सुविधा या सर्व सभासदनासाठी असतात आणि त्याच बरोबर इतर सामायिक सोयी-सुविधा म्हणजेच रस्ते, बगीचा, सिक्युरिटी यांचा खर्च कोणी  करायचा आणि अश्या सामायिक सोया-सुविधांची मालकी कोणाकडे असे प्रश्न निर्माण होतात. रेरा कायद्याप्रमाणे ५१% बुकिंग झाले कि सोसायटी /अपार्टमेन्ट कायद्याप्रमाणे स्थापन करण्याची जबाबदारी बिल्डरवरती असते.     जेव्हा एखाद्या प्रोजेक्ट मध्ये   ५  किंवा त्या पेक्षा जास्त सोसायटी (एक बिल्डिंग एक सोसायटी असे)  असतात  अश्या सर्व बिल्डिंगची मिळून एक शिखर संघटना /सोसायटी  ज्याला Co. Operative Association किंवा Federation ची स्थापना करता येत...