Posts

गाडी विकणाऱ्यांना सर्वोच्च दिलासा ! ऍड. रोहित एरंडे ©

गाडी विकणाऱ्यांना सर्वोच्च दिलासा ! ऍड. रोहित एरंडे © नवीन गाडी घेताना बऱ्याचदा जुनी गाडी एक्सचेंज केली जाते आणि   गाडीचे पैसे दिले-घेतले जातात. आर. टी.ओ फॉर्म्स वरती सह्या देखील कार-एक्सचेंज करणाऱ्यांकडून घेतल्या जातात, पण एकतर ती गाडी पुढे   कधी विकली जाईल हे माहिती नसते आणि विकली गेल्यावर देखील  आर.टी.ओ  रेकॉर्डमध्ये वाहन मालक म्हणून नवीन मालकाचे नाव बदलले गेले आहे  का हे तपासण्याचे  देखील बहुतांशी लोकांच्या गावी नसते. कारण   गाडीचा अपघात झाला तर आर. टी.ओ रेकॉर्ड सदरी ज्याचे नाव मालक म्हणून नोंदविले गेले आहे त्याच्यावर ते उत्तरदायित्व येते. मोटर वाहन कायद्याच्या कलम २(३०) प्रमाणे ज्या व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्रेशन झालेले असते, तीच व्यक्ती गाडीची मालक समजली जाते. याला अपवाद म्हणजे ती व्यक्ती अज्ञान असेल तर किंवा हायर-पर्चेस कराराने गाडी घेतली असेल तर अनुक्रमे त्या व्यक्तीचा पालक आणि ज्याच्या ताब्यात गाडी असेल ती व्यक्ती मालक समजली जाते. नुकसान भरपाई मागणाऱ्या व्यक्तीला नुकसान भरपाई मिळणे सोपे जावे आणि रजिस्टरला नोंद न झालेल्या वेगवेगळ्या तथाकथीत गाड...

पतीच्या मृत्यूनंतर त्याची मिळकत कशी विभागली जाईल ? ऍड. रोहित एरंडे.©

 पतीच्या मृत्यूनंतर त्याची मिळकत कशी विभागली जाईल ? ऍड. रोहित एरंडे.© आमच्या   बिल्डिंगचे आता पुनर्विकासाचे ठरत आहे.  त्यामध्ये माझ्या आणि माझ्या पतीच्या  नावे एक फ्लॅट आहे. माझ्या पतीचे मागच्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांनी कोणतेही मृत्यूपत्र केले नव्हते.  मूळ ऍग्रिमेंट मध्ये पहिले नाव माझ्या पतीचे आणि दुसरे माझे आहे. त्यामुळे आता त्यांचा हिस्सा बायको म्हणून मला एकट्यालाच मिळेल,  का आमच्या दोन्ही मुलांना त्यात काही हिस्सा मिळेल आणि हेच नवीन फ्लॅटला हि लागू होईल का  ? एक वाचक, पुणे  आपल्यासारखे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात. अनेक लोकांना असे वाटत असते कि वैवाहिक साथीदाराच्या मृत्यूनंतर उर्वरित जोडीदाराच आपोआप एकटा १००% मालक बनतो. तसेच अनेक गैरसमज असा आहे कि पहिले नाव ज्याचे असते त्याचा हिस्सा किंवा अधिकार हा दुसरे नाव असलेल्यापेक्षा जास्त असतो आणि पहिले नाव असलेली व्यक्ती मयत झाली कि आपोआप सर्व हक्क दुसरे नाव असलेल्या व्यक्तीलाच मिळतो.  एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाट...

जिवंतपणीच दोन पुनर्जन्म... काळ आला होता, पण वेळ नाही. . दरवर्षी ३ नोव्हेंबरला हे दोन दुर्धर प्रसंग आठवतातच ऍड. रोहित एरंडे.

 जिवंतपणीच दोन पुनर्जन्म... काळ आला होता, पण वेळ नाही. . दरवर्षी ३ नोव्हेंबरला हे दोन दुर्धर प्रसंग आठवतातच  ऍड. रोहित एरंडे. © मरणानंतर पुनर्जन्म असतो की नाही हा वादाचा विषय असू शकतो.. परंतु जिवंतपणी पुनर्जन्म मिळू शकतो ? उत्तर आहे होय आणि योगायोगाने दोन्ही घटनांची तारीख होती ३ नोव्हेंबर. पहिली घटना आहे माझे सासरे आणि पुण्यातील प्रख्यात वकील श्री. पी.पी. परळीकर ह्यांच्या बाबतीतील. सुमारे २००६ साली त्यांना लिंफनोड (N H L) च्या कॅन्सरचे निदान झाले. त्याचे केमो - रेडिएशन असे उपचार सुरू झाले. ह्या उपचाराचे काही साईड एफिकेट्स असतातच. त्याचाच परिपाक म्हणजे सासऱ्यांना एक दिवस अचानक cardiac arrest आला आणि ते घरीच कोसळले. घरच्यांनी आणि शेजारच्या सहस्रबुद्धे काकांनी ( सकस वाले) पटकन त्यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये हलविले, परंतु हे १० मिनिटांचे अंतर देखील त्यावेळी काही तासांचे वाटत होते. तिकडे लगेचच उपचार सुरू झाले, परंतु त्यांचे हृदय जवळ जवळ बंद पडले होते, नाडी लागत नव्हती. डॉक्टरांनी २ शॉक देवून सुध्दा हृदय सुरू झाले नाही आणि स्क्रीन वरती फ्लॅट लाईन आली. त्यावेळचे तेथील आय सी य...

एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ? - ऍड. रोहित एरंडे ©

एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ? नमस्कार. आमच्या सोसायटीमध्ये आमच्यासारखे २० एक सभासद असे आहेत ज्यांनी  २ फ्लॅट एकत्र केले आहेत. बिल्डरनेच तसे करून दिले आहेत. मात्र करारनामे वेगळे आहेत. पण असे दोन फ्लॅट घेऊन एकत्र करून त्यात एकच कुटुंब रहात असेल  कमिटीचे म्हणणे आहे कि मेंटेनन्स २ फ्लॅटचाच  घ्यावा लागेल  आणि त्यासाठी ते कायदेशीर सल्ला घेणार आहेत. तर  तर सोसायटीने मेंटनन्स एकाच फ्लॅटचा घ्यावा कि दोनचा, याबाबत जनरल बॉडीने एकच मेंटेनन्स घ्यायचा ठरविला तर ? कमिटीचे म्हणणे बरोबर आहे का आणि त्यांना कायदेशीर सल्ला घेता येईल का ? एक वाचक. पुणे  सोसायटी आणि सभासद ह्यांच्यामधील वादांचे मूळ कारण हे बहुतेक वेळा आर्थिक विषयाशी संबंधित असते. आपण एकात एक अनेक प्रश्न विचारले आहेत आणि त्याचे उत्तर थोडक्यात द्यायचे प्रयत्न करतो. आपल्यासारखे प्रश्न अनेक ठिकाणी दिसून येतात.  बऱ्याचदा लोकांना हे लक्षात येत नाही कि कायदा आपल्याला आवडेल असा असतोच असे नाही. बिल्डर कडून  फ्लॅट  घेताना जेव्हा २ स्वतंत्र  करार केले याचाच अर्थ ते मंजूर नकाशावरती...

सभासदांचे कौटुंबिक वाद पुनर्विकास थांबवू शकत नाहीत. ऍड. रोहित एरंडे ©

 सभासदांचे कौटुंबिक  वाद पुनर्विकास थांबवू  शकत नाहीत.   ऍड. रोहित एरंडे ©  आमच्या सोसायटीची पुनर्विकास प्रक्रिया नियमाप्रमाणे सुरु होऊन डेव्हलपरची  देखील बहुमताने निवड झाली आहे. परंतु २ सभासद असे आहेत कि फ्लॅटची मालकी कोण यामध्ये वारसांमध्ये  वाद चालू आहेत आणि एका सभासदाने तर वाटपाचा दावा केला आहे. परंतु या वादामामुळे हे सभासद कशावरही सही करायला तयार नाहीत आणि फ्लॅटचा ताबा द्यायलाही तयार नाहीत. तर अश्या सभासदांविरुध्द काय करता येईल ?    कमिटी सदस्य, पुणे  पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट)  आणि विरोध या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.   हा निर्णय  पारदर्शकपणे आणि आपापल्या गरजांचा साधक बाधक  विचार करून घ्यायचा असतो यात काही शंका नाही. परंतु तो निर्णय घेणे आणि तो प्रत्यक्ष अंमलात आणणे या मधले अंतर किती असेल हे काही सांगता येत नाही, याच्याशी या विषयावर काम करणारे लोक सहमत होतील. पुनर्विकासाला विरोध करण्याची अनेक कारणे असतात. परंतु अशा विरोधी  या मानसिकतेला न्यायालयांनी आपली अनेक निकालांमधून चपराक लगावताना नमू...

पुनर्विकास : नवीन फ्लॅट कुठल्या मजल्यावर मिळावा ? ऍड. रोहित एरंडे

पुनर्विकास : नवीन फ्लॅट कुठल्या मजल्यावर मिळावा ?  आमच्या  ४० सभासदांच्या   सोसायटीमध्ये २ बीएचके आणि ३ बीएचके असे वेगवेगळे फ्लॅट आहेत. आता रिडेव्हलपमेंटसाठी  बिल्डरची   नेमणूक झाली आहे. नवी इमारतीमध्ये काही सभासदांनी जादा एरिया विकत घेण्याची तयारी दाखविली आहे तर काहींचा अजून विचार चालू आहे. या सर्व बाजूंचा विचार करून बिल्डरने ३-४ प्रकारच्या  फ्लॅटचे डिजाईन दिले. सर्व सूचनांचा  अनेकवेळा विचार करून   विशेष सभेमध्ये  Allotment फायनल करून घेतली. यामध्ये ४-५ महिने गेले आहेत.  मात्र आता एक ग्रीडचे सभासद Allotment मान्य  नाही असे म्हणत आहेत  आणि रोख आमच्यावर आहे.   आता बिल्डर देखील डिझाईन बदलता येणार नाही असे म्हणत आहे.   तरी या बाबत कसा मार्ग काढावा ? कायदा काय सांगतो ?  त्रस्त   मॅनेजिंग कमिटी सदस्य, पुणे  "लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून"  यासारखी  आता रिडेव्हलपमेंट म्हणजेच पुनर्विकास पाहावे करून अशी नवीन म्हण तयार करता येईल.  कारण पुनर्विकास प्रक्रिया सुर...

मुलांचे खेळ आणि नियमावली : ऍड. रोहित एरंडे ©,

 मुलांचे खेळ आणि नियमावली ..  सर आमच्या सोसायटीत एक  common garden व children play area आहे. तिथे लहान मुलांसाठी घसरगुंडी व झोपाळा आहे. काही झाडे पण तेथे लावली आहेत. सोसायटीत क्रिकेट व फुटबाॅल खेळण्यास बंदी आहे. तरी काही 7 वी 8 वीतील मुले त्याच्या बाजुला असलेल्या drive away किंवा इमारत व  garden च्या मधे फुटबाॅल खेळतात. मध्यंतरी  त्यावरुन वादावादी झाली कारण एका लहान मुलाला बाॅल लागला असता. त्यावर काही सभासदांचे म्हणणे आहे की मधल्या गार्डनच्या जागी झाडे कापुन नेट लावुन तो Area cover करुन मुलांना खेळायला जागा करायची. असे कायद्याने सोसायटी करु शकते का? कारण काही सभासदांचा ह्याला विरोध आहे.  एक वाचक, पुणे :  आपल्या प्रश्नाच्या निमित्ताने  आदर्श उपविधी १६८ याचा उल्लेख करणे गरजेचे आहे आणि तो सर्वांच्या माहितीकरिता खाली उद्धृत केला आहे. या नियमावर कधी लिहायला लागेल असे वाटले नव्हते. असो.  १६८ - संस्थेच्या आवारात खेळ खेळण्यावर निर्बंध : संस्थेची इमारत  / इमारती यांचे स्थान  लक्षात घेऊन तसेच इमारतीचा परिसर आणि संस्थेच्या सदस्यांना आणि त्यांच...

ग्राहकाचे खरेदीखत हरविल्याबद्दल बँकेला ५ लाख रुपयांचा दंड ! ऍड. रोहित एरंडे.©

ग्राहकाचे  खरेदीखत हरविल्याबद्दल  बँकेला ५ लाख रुपयांचा दंड ! ऍड. रोहित एरंडे.©   कर्ज मिळवण्यासाठी काय काय करावे लागते, किती कागदपत्रे  गोळा करावी लागत आणि ती बँकेत द्यावी लागतात ह्यावरून 'कर्ज पहावे घेऊन' हे का म्हटले आहे ते कळेल. तर कर्जाची मंजूर झालेली रक्कम अदा  करताना बँक त्या जागेचे  मालकी हक्काची मूळ (original )कागदपत्रे म्हणजेच खरेदीखत, ताबे पावती, फ्लॅट रिसेल चा असेल, तर पूर्वीच्या मालकाची खरेदीखत , साठे खत इ. सर्व अस्सल कागदपत्रे आपल्या ताब्यात तारण म्हणून ठेवून घेते आणि त्याची पोच कर्जदाराला देते (अशी पोच घेणे खूप महत्वाचे असते)  आणि  हि कागदपत्रे कर्ज फेडल्यावर सुस्थितीत परत देण्याची जबाबदारी बँकेवर असते.  बहुतेक  बँकांची अशी कागदपत्रे ठेवण्यासाठी वेगळे विभाग असतात.   परंतु अशी कागदपत्रे बँकेतून गहाळ झाली तर बँकेचे  दायीत्व  काय ? या प्रश्नावर   राष्ट्रीय ग्राहक आयोगाने एका याचिकेवर नुकताच १९ ऑगस्ट २०२४ रोजी निकाल  देताना " खातेदारांची कागदपत्रे हरविणे हि गंभीर बाब असून सेवेमधील मोठी त्रुटी आहे"...

वक्फ बिल काय आहे ? - ऍड . रोहित एरंडे

वक्फ बिल काय आहे ? वक्फ बोर्डांच्या कामकाजात अधिक उत्तरदायित्व आणि पारदर्शीता सुनिश्चित करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने  १९९५ च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेत विधेयक मांडले आणि अपेक्षेप्रमाणे त्याला भरपूर विरोध झाला आणि सध्या प्रस्तावित कायदा  संसदेच्या संयुक्त समितीकडे पुनर्विलोकनसाठी गेला आहे. याचबरोबर नागरिकांकडून  सुध्दा हरकती /मते मागविली आहेत. मात्र या संदर्भात उलट-सुलट माहितीने सोशल मिडिया भरून गेला आहे आणि लोकांचा डेटा -पॅक खर्ची पडला आहे. तरी प्रस्तावित बदल आणि त्याअनुषंगाने या विषयाचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न..  खरे तर हा काय किंवा कुठलाही कायदा करण्याआधी लोकांची मते मागवली जात नाहीत आणि मागवली तरी ती मते बंधनकारक नाहीत.. 'अल्ला' आणि 'इस्लाम धर्माच्या' नावावर धर्मादाय हेतूने कायमस्वरूपी लेखी /तोंडी कराराने दान केलेली स्थावर -जंगम संपत्ती म्हणजे वक्फ होय.  या कारणासाठी पूर्वापार एखाद्या मिळकतीचा वापर होत असेल तर अशी मिळकत सुद्धा वक्फ मिळकत समजली जाते, मग असा वापर थांबला तरी मिळकत वक्फच समजली जाते. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर वक्फ म...

हिंदू पुरुषाचे वारस कोण ? मृत्युपत्र केले नसेल तर वारसा हक्क कायदा लागू होईल.. ऍड. रोहित एरंडे.©

हिंदू पुरुषाचे वारस कोण ? मृत्युपत्र केले नसेल तर वारसा हक्क कायदा लागू होईल.. ऍड. रोहित एरंडे.© माझ्या पतीने   त्यांच्या स्वकमाईतून एक फ्लॅट विकत घेतला होता त्या फ्लॅटमध्येच मी राहते.   मागील वर्षी माझ्या पतीचे निधन झाले मात्र  त्यांनी कोणतेही विल करून ठेवलेले नव्हते.  आम्हाला मूल -बाळ नाही. आता हिंदू वारसा कायद्याप्रमाणे  मी एकटीच माझ्या पतीची कायदेशीर वारस असल्याने तो फ्लॅट माझ्या एकटीच्या मालकीचा झालेला असतानाही आता अचानक आमच्याशी कुठलेही संबंध न ठेवलेले   माझे दीर म्हणत आहेत कि त्यांच्या आईचा म्हणजेच माझ्या सासूबाईंचा देखील त्या  फ्लॅटमध्ये हिस्सा आहे.   तर माझ्या सासूबाईंना हिस्सा मिळेल का ? एक वाचक, पुणे. तुमच्यासारखे प्रश्न अनेकांना पडत असतील.  आपल्या मृत्युनंतर आपले कायदेशीर वारस कोण होतात याची अनेकांना माहिती नसते आणि त्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात.   एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो.    तर ...

आरक्षणाला "सर्वोच्च" सकारात्मक वळण : ऍड. रोहित एरंडे ©

आरक्षणाला  "सर्वोच्च" सकारात्मक वळण :  ऍड. रोहित एरंडे ©  जात विरहित समाज रचना असावी हि मागणी  सर्व विचारवंत करतात.  जाती उच्चारली तर गुन्हा होऊ शकतो आणि लिहिली तर आरक्षण मिळू शकते असे गंमतीने म्हटले जाते.   "जन्माने प्राप्त झालेली जात बदलता येत नाही, त्यामुळे 'लग्न झालेल्या महिलेला तिच्या पतीच्या जातीचा फायदा मिळणार नाही" किंवा 'एकवेळ धर्म बदलता येईल पण जन्माने प्राप्त झालेली 'जात' नाही, असे   सर्वोच्च न्यायालयाचेहि  स्पष्ट निकाल आहेत. या आरक्षणावरून देशभरात वेगवेगळ्या जातीसमुदायासाठी  वेगवेगळी आंदोलने चालू असतात आणि दुसरीकडे जातीय  आरक्षण हटवा आणि फक्त आर्थिक निकषांवर आरक्षण ठेवा अशीही मागणी होत असते. प्रत्येक राज्यांमध्ये तेथील सामाजिक परिस्थितीप्रमाणे जातीआधारित आरक्षण देणार कायदे केले आहेत.  या पार्श्वभूमीवर अनुसुचित जातींसाठी असलेल्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करता येईल का असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या ७ सदस्यीय घटनापीठापुढे उपस्थित झाला होता. त्यावर ६-१ अश्या बहुमताने निकाल देताना या पूर्वीचा ई. व्ही. चिन्नया वि . आ...

नॉमिनी सभासदाला (Provisional Member) मतदानाचा हक्क : ॲड. रोहित एरंडे ©

 नॉमिनी सभासदाला (Provisional Member) मतदानाचा हक्क : ॲड. रोहित एरंडे © प्रश्न : आमच्या फ्लॅटसाठी माझ्या वडिलांनी मला नॉमिनी नेमले होते. वडिलांच्या मृत्युनंतर मी सोसायटीमध्ये सभासदत्व मिळविण्यासाठी अर्ज दिला, पण   सोसायटीने माझे नाव शेअर सर्टिफिकेटवर प्रोव्हिजनल सभासद म्हणून लावले आणि मला मतदानाचा हक्क नाही असे म्हणून सोसायटीने मला  सभांमध्ये भाग घेण्यापासून रोखले आहे. तरी याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.  एक वाचक, अंधेरी, मुंबई  उत्तर : नॉमिनी म्हटले कि गैरसमज आणि वाद हे आलेच असे आता म्हणावे लागेल. सोसायटीमध्ये मूळ सभासद मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये आणि नॉमिनी मध्ये बऱ्याचदा वाद निर्माण होतात आणि अश्यावेळी सोसायटी कमिटीपुढे ह्या वादाचे निरसन कसे करायचे असा प्रश्न निर्माण होतो.  परंतु सहकार कायद्यात दिनांक ९ मार्च २०१९ पासून  झालेल्या बदलाप्रमाणे कलम १५४(बी) हे नवीन कलम दाखल झाले आहे. ज्यायोगे सभासदांच्या व्याख्येमध्ये  पहिल्यांदाच नॉमिनी म्हणून नेमलेल्या व्यक्तीला "प्रोव्हिजनल मेंबर " म्हणजेच  थोडक्यात  कारणापुरता  /तात्प...

पिठोरी अमावास्या - भारतीय मातृदिन... ऍड. रोहित एरंडे ©

 पिठोरी अमावास्या - भारतीय मातृदिन...   ऍड. रोहित एरंडे  © फ.मु. शिंदे त्यांच्या प्रसिध्द "आई" या कवितेचा शेवट करताना म्हणतात "आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही... "  प्रेमस्वरूप - वात्सल्यसिंधू असे संबोधल्या गेलेल्या आईची महती सांगण्यासाठी वेगळ्या शब्दांची गरजही नाही. जगभरात 'मे'  महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जातो  तसे बघितले तर प्रत्येक दिवस हा 'मदर्स डे'च असतो.. पण  मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी असल्यामुळे प्रत्येक कारणासाठी "दिनविशेष" असतोच. त्याचप्रकारे जगभरात आईसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' (Mothers Day) साजरा केला जातो. तो साजरा कराच..    परंतु आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहिती नसेल कि भारतामध्ये  कित्येक शतके  श्रावण महिना संपायच्या दिवशी म्हणजेच श्रावण  अमावस्येला ज्याला   'पिठोरी अमावस्या' म्हणतात, त्यादिवशी  'मातृदिन' म्हणजेच आत्ताच्या भाषेत 'मदर्स डे साजरा करण्याची पद्धत आहे.    पिठोरी अमावस्येदिवशी मातृ...

अपार्टमेंटची सोसायटी करणे कायद्याने बंधनकारक नाही. ऍड. रोहित एरंडे. ©

अपार्टमेंटची सोसायटी करणे कायद्याने बंधनकारक नाही. ऍड. रोहित एरंडे. © सर, आमच्या सारख्या छोट्या शहरांमध्ये बरेच वर्षांपासून अपार्टमेंट करण्याची पद्धत आहे. मात्र काही दिवसांपासून आमच्या इथे तसेच सांगली, मिरज,  कऱ्हाड या भागात देखील अपार्टमेंटची  सोसायटी केली नाही तर  तुमचे मालकी हक्क जातील अशी भिती लोकांच्या मनात बिंबवली जात आहे आणि त्यामुळे आम्ही बांधलेल्या जुन्या बिल्डींगमधले लोकं देखील आता साशंक झाली आहेत.  तर अपार्टमेंटची सोसायटी करता येते का  आणि करणे बंधनकारक  आहे का  आणि यासाठी  आमची संमती गरजेची आहे का  ?  एक बांधकाम व्यावसायिक, कोल्हापूर    सर्वप्रथम  एखादी गोष्ट कायद्याने करावीच लागते  आणि एखादी गोष्ट कायद्याने करता येते , हा महत्वाचा  फरक कायम लक्षात घ्यावा.  उदा. वय वर्षे  १८ आणि २१  पूर्ण झाल्यावर   अनुक्रमे मुली आणि  मुले   कायदेशीरपणे  लग्न करू शकतात, पण  ह्याचा अर्थ त्या  वयाचे झाल्यावर  लग्न करायलाच पाहिजे असे नाही. असे उदाहरण द्यायच...

आले रे उत्सव , पण कायदे सांभाळा : "कायद्याचे अज्ञान" हा कधीही बचाव होऊ शकत नाही.. ॲड. रोहित एरंडे.©

आले रे उत्सव , पण कायदे सांभाळा : "कायद्याचे अज्ञान" हा कधीही  बचाव  होऊ शकत नाही.. ॲड. रोहित एरंडे.©     जाणते  -अजाणतेपणे कायदा मोडला गेल्यास "कायद्याचे अज्ञान" हा कधीही बचाव  होऊ शकत नाही. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव, दहीहंडी   अवघ्या काही  दिवसांवर येऊन  ठेपले आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका,   ढोल-ताशांचा सराव  देखील सुरु झाले आहेत . परंतु  हे सर्व करताना उत्साहाच्या भरात आपल्या हातून कायद्याचा भंग तर होत  नाहीना ह्याचे भान   राखणे गरजेचे आहे.    गेल्या काही काळात  सर्व धर्मीय सण -समारंभांमुळे होणाऱ्या  त्रासांविरुद्ध काही जनहित याचिका दाखल केल्या गेल्या आणि त्यावर मुंबई उच्च न्यायालायने, सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचा आधार घेऊन, दिलेले निकाल  खूपच  स्पष्ट आहेत.  दर वर्षी कोणी ना कोणीतरी ह्या संदर्भात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावतोच.. कुठल्याही धर्माचा सण समारंभ असो, प्रमुख आक्षेप असतो ध्वनी प्रदुषण आणि मंडप. या बाबत न्यायालयीन निर्णय...